Posts

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ६ 'फेर आई रे मौरा '

Image
काही वर्षांपूर्वीपर्यंत मी शेतावर फारशी येत नसे. घरच्या जबाबदाऱ्या, व्यवसायाची गणितं, शिकणारा मुलगा आणि वृद्ध सासू-सासरे एवढ्या धावपळीत तेवढी फुरसत नसायची. पण नंतर महेश कामाच्या निमित्ताने दीर्घ वास्तव्यासाठी परदेशी गेला. मग अधूनमधून तरी आपण शेतावर चक्कर मारायला हवी, असं वाटायला लागलं. शेताच्या रस्त्यात एक भलीमोठी दगडाची खाण आहे. त्यामुळे त्या भागात डंपरची वाहतूक अहोरात्र चालू असते. त्या काळजीने एकटीने चारचाकी चालवत जायला नको वाटायचं. मग माझा भाचा आणि मी असे एखाद्या महिन्याने शेत-फेरी करायचो. त्याआधी कधी गेलेच तरी महेशबरोबर जाऊन त्याच्याबरोबर घरी येत असे. त्यामुळे रस्ताही धड माहिती नव्हता. भाच्याबरोबर जाताना तळेगावपासून पुढे गेलो की आम्ही ऍलर्ट मोडमध्ये जायचो. सगळ्याच वाटा आणि शेतं ओळखीचीही वाटायची आणि अनोळखीही. शेताजवळच्या खेड्यात एक शाळा आहे. मदतनिसाला त्या शाळेपाशी थांबायला सांगायचे. तो भेटला की त्याच्या मागेमागे जाता येत असे. त्याला ह्याची फार गंमत वाटायची. ‘तुमचं रान तुमाला सापडेना. काय करावं आता!!’ अशी चेष्टा होत असे. पुण्यात मी आरामात पत्ते शोधते. ‘ह्या चौकातून डावीकडे. त्या दुक

गीतानुभव

Image
. नुकताच म्हणजे ३ डिसेंबर रोजी दुपारी पुण्यात स.प महाविद्यालयाच्या मैदानावर गीता पाठ महायज्ञ झाला. दहा हजाराहून जास्त लोकांनी एका सुरात, एका लयीत गीतेच्या अठरा अध्यायांचे पारायण केले. त्याबद्दलचे माझे चार शब्द. तिथे मांडवात बसून मैत्रिणींच्या जागा पकडून त्यांची वाट बघताना मनात माझ्या गीता संथा प्रवासाचे विचार मनात घोळत होते. मैत्रिणी आल्या. बरोबर ठरलेल्या वेळेला शंखनाद होऊन गीता पठणाला सुरवात झाली. सर्व अध्याय पाठ असलेल्या मंडळींना भगवे कपडे आणि वाचन करणाऱ्यांना पांढरे कपडे असा ड्रेसकोड होता. दहा हजारांपेक्षा जास्त मंडळी एका तालात, एका लयीत, एका उच्चारात अध्याय म्हणत होती. एकच मोठा आवाज असावा, असं वाटत होतं. हा अनुभव फार वेगळा होता. भाषणं, सत्कार, शाली, पुष्पगुच्छ ह्यात वेळ न गेल्यामुळे वेळापत्रक चोख पाळलं गेलं. गीता धर्म मंडळाचे सदस्य आणि इतर स्वयंसेवक ह्यांचं ह्यासाठी अभिनंदन. कार्यक्रम उत्तम झाला. व्यवस्थापन चोख होतं. घरी परत येताना वाटलं की गीता आपल्याला प्रथम कधी माहिती झाली? एक ऑगस्टला शाळेत टिळक पुण्यतिथी साजरी होत असे. बाईंनी लिहून दिलेली भाषणं पाठ करताना त्यात ‘स्वराज्य हा माझ

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५

Image
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो. पुण्यातली गजबज आणि शेताजवळच्या खेड्यातलं वातावरण इतकं वेगळं असतं, की दुसऱ्या ग्रहावर गेलो आहोत, असं वाटायला लागतं. तरी पुण्यापासून फार दूर नाहीये. घरून निघाल्यापासून दीड तासात तिथे पोचता येतं. जाताना बंगलोर हायवे. नंतर जुना मुंबई-पुणे रस्ता, तळेगाव औद्योगिक वसाहतीचा रस्ता अशा पायऱ्या उतरत मग खेड्याच्या रस्त्याला लागतो. त्या रस्त्यावर एक प्रचंड मोठी दगडाची खाण आहे. तिथून दगड, खडी वाहून नेणाऱ्या डम्पर, ट्रकची वाहतूक सगळ्या परिसरावर धूळ उडवत अव्याहत चालू असते. ह्या जड वाहनांमुळे रस्त्यात

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून…  लेखक अशोक जैन श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत. राजधानीतून…’ ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागात, जैनांना दिसलेल्या दिल्लीबद्दल, ते तिथे असताना घडलेल्या काही घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल लिहिलं आहे. दुसऱ्या भागात त्यांनी लिहिलेल्या सुमारे पाचशे वार्तापत्रांपैकी काही निवडक वार्तापत्रे दिली आहेत. अत्यंत वेधक अशा आठवणी मार्मिक, ओघवत्या भाषेत लिहिल्या असल्याने पुस्तक वाचायला फार मनोरंजक झाले आहे. आता ह्या पुस्तकात उल्लेख असलेले फारच कमी नेते राजकारणात सक्रिय आहेत. काही निवृत्त झाले, काहींना जनतेने निवृत्त केलं तर काही काळाच्या पडद्याआड गेले. ज्या संसद भवनाबद्दल, सेंट